जागतिक प्रभाव आणि वर्चस्वासाठी भारत, चीन आणि अमेरिकेमध्ये स्पर्धा चालू आहे…
चीनने भारतापेक्षा कितीतरी अधिक पटीने पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याने अमेरिकेच्या आंतरराज्य महामार्गाच्या तोडीचे रस्ते; नवीन वेगवान रेल्वेमार्ग, विमानतळे आणि सागरी बंदरे बनवलीत. त्याचबरोबर पूरनियंत्रण आणि वीजनिर्मितीसाठी अनेक धरणे बांधली आहेत. कोळश्यावरील आणि आण्विक ऊर्जेवरील वीज प्रकल्प उभारले आहेत. या सगळ्या क्षेत्रांत भारत खूप पिछाडीवर आहे.......